Saturday 8 May 2021

कसं राहायचं "OK" ?

कुणीही भावनावश होवून काही सांगू लागलं हल्ली, कि पटकन म्हणतो आपण "होईल ठीक सगळं, Everything will be alright,OK !" आणि बहुतेक वेळा,हे ताबडतोब , तिथल्या तिथे सांगितलं जातं. समोरच्याला पूर्ण व्यक्त  देखील होऊ न देता. जणू काही ती व्यक्ती नैराश्याने प्रचंड खचून गेली आहे आणि लगेच कोसळेल वगैरे !

तर सर्वात आधी : त्या व्यक्तीच ऐकून तर घेऊ

होऊ शकतंय,कि त्यांच्या बोलण्यात अतिरिक्त नकारत्मक भाव व्यक्त होत असतील. तरीही आधी ऐकुयात. लगेच नको सांत्वन. थोडा दम खाऊ. 

थोडा विचार बदलून पाहू :-

सध्याच्या (कोरोना) काळाच्या संदर्भात बोलायचं झाल्यास; मृत्यू, इस्पितळ, बंद पडणारे व्यवसाय, HRCT, अशाच बातम्या यायच्या कानावर.काळच मुळी आहे तसा. युद्धाच्या काळात युद्धाच्या बातम्या; मृत्युच्या बातम्या येतात, अगदी तस्सच. त्यामुळे ठीकच.

उगाच media ला दोषी नको धरायला. त्यांच्यामुळे आपल्या पर्यंत बातम्या पोचतात; म्हणजे ते दोषी नाही ठरत. ते आपले काम करताहेत. त्यांना काय, बातमी हि बातमी , बास. काय सकारात्मक, काय नकारात्मक : हे आपण ठरवतो. आपल्या सोयीनुसार. युद्धात पाकिस्तानी मारला जाणं हि सकारात्मक बातमी आपल्यासाठी, तर नकारात्मक ठरते त्या पाकिस्तानी लोकांसाठी. आपण नाही का आपलं काम करत ! तसेच त्यांचेही ते कामच. 

सरकारलाही नको दोषी धरायला. तेही त्याचं काम करताहेत. कुठलं इकडचं तिकडचं ऐकून आपली whatsapp पत्रकारिता बुद्धी नको झळकवायला. सरकार म्हणजे.... लोक प्रतिनिधींचा समूह, जर आपल्याला एखाद्या तरी समूहाच्या नेतृत्वा बद्दल काही अनुभव नसेल , तर खरंच अधिकार देखील नाहीये टीकेचा. कुतूहल वेगळं आणि नावे ठेवणं वेगळं.

अगदी अध्यात्मिक जरी वाटलं , तरी जसा जन्म, तसा मृत्यू. पान नाही का ? झाडावर फुटतं, हिरवं गार होतं, पिवळं होतं, गळून पडतं, तसच आपलं. क्वचित प्रसंगी कीड लागली तर मध्येच जातं. असेच हे अकाली मृत्यू. 

चिंता , काळजी वाटते ती "मला, माझ्या कुटुंबियाना काही होईल" ह्या विचाराने फक्त. मी मध्येच गेलो, तर काय होईल वगैरे ह्या विचारांनी. अनाठायी आहेत का हे विचार ? नाही. तरी आवरायला मात्र हवेत. कारण नेहमी येत नाहीत हे. ह्या काळामुळे येताहेत. त्यामुळे निरर्थक ठरतात. हे छोटं तंत्र वापरून पहा. मुळात, माझं जीवन मरण हे काही इतकं महत्त्वाचं नाही हे समजून घ्यायला हवं. आणि माझ्या पश्चात काय हा सुद्धा विचार नको. मुळात मीच नसेन, तर ह्या सगळ्याचा मतलबच काय ,नाही का ! होतात तयार माणसे. 

इनामदार blouse च्या सौ. श्वेता इनामदार ह्यांची मुलाखत मला प्रकर्षाने आठवते. त्यांच्या आजच्या धडाडीच्या स्वभावाचं बरचसं श्रेय; मी त्यांच्या वडिलांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे त्यांच्यावर आलेल्या जबाबदारी ला देईन. तात्पर्य : मी अचानक गेलो/गेले तर ह्यांचं कसं होणार हि काळजी अनाठायी . "कर्तव्य" हे जगण्याचा आधार असते, त्यामुळे, अचानक जाऊ त्याच्या आधी हे व्हायलाच हवं आणि नाही झालं तर कसे वगैरे विचार नका करू. मै पल  दो पल का शायर हुं  ह्यात एक ओळ आहे : मुझसे  बेहतर  कहने वाले ,तुमसे  बेहतर  सुनने वाले .तेव्हा चिंता नको. 

"हे सगळ कधी संपायच " .....असही वाटत राहत ! कुणालाच ठाऊक नाही; तरी संपणार हे मात्र निश्चित ठाऊक आहे. ह्या साथीच्या रोगांची मानवजातीला चांगलीच माहिती आहे. अगदी इसवीसनाच्या आधीपासून हे चालूच आहे. अगदी अलीकडच्या वर्षांतले सांगायचे तर १९१८-२१ उद्भवलेला spanish फ्लू ह्यात ५ कोटी मृत्यू , त्यातले १/३ भारतीय (१.५ ते 2 कोटी)होते. शिवाय इतिहासात आपल्याला अनेक उदाहरणे सापडतील ज्यात अनेक वेळा मोठी मोठी लोकसंख्या बळी पडली आहे. त्यामुळे हे पहिल्यांदाच नाहीये घडत , आणि तसा सृष्टीकरता हा एक नियमित प्रकार आहे, आपल्या पेस्ट कंट्रोल सारखा 🤣

वस्तुनिष्ठ व्हावं आणि समोरचं काम करत राहणे हा उपाय छान work होतो. असे विचार कधी मधी छळत राहतील. विशेष करून एखादी जवळची व्यक्ती वगैरे गेली / Hospitalized झाली की. तर मित्रांनो , एक अशी सवय लाऊन घ्या : शक्यतो एखादी लकब : जसं कि चुकीच बोलल्यावर जीभ चावणे. तर करायचं असं, कि आपल्या  मनात असे विचार येवू लागताच आपण हि लकब वापरायची. सराव केल्याने जमायला लागतं. आता अचानक आलेली घटना काही आपल्याला सांगून येत नाही. त्यामुळे ताबडतोब आपली एक सवयीने प्रतिक्रिया येते. परंतु इतर वेळी ठरवून आपण हाच सराव छोट्या छोट्या घटनांबाबत केला तर आपल्या मनाला नवं Behaviour कळतं आणि आपण भावना बदलू शकतो.

परंतु इतर वेळी मात्र ह्या पासून दूर राहण्यासाठी "समोरचे काम" हा उत्तम उपाय आहे. काम आपल्याला विचार करायला लावणारे असायला हवे. ज्यात, मेंदू -बुद्धी खर्च व्हायला हवी.  कामामुळे तो थकला तरी चालेल, पण मोकळा नको शक्यतो. अगदी Pack बंद करून टाका schedule. कडक पहारा. आणि हे सगळं "खेळा" सारखं घ्या. त्यात स्ट्रेस नको. IPL बघितल्या सारखं. 

आदित्य बिर्ला हे मोठे उद्योगपती शेवटचे वर्षभर कर्करोगाने रुग्णालयात होते. अगदी जाण्याच्या दिवसापर्यंत नवनव्या प्रकल्पांची कागदपत्रे हाताळत होते. हाच तो वस्तुनिष्ठ पणा. हाच गीतेतला कर्मयोग. हळू हळू ह्याचा सराव होतो, आणि मग "Business As Usual" हे कौशल्य आत्मसात होऊ लागेल.

1 comment:

निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.