मी आता खाली एक इमेज शेअर करतोय. कदाचित तुम्हाला काही समजणार नाही, पण मी समजावून सांगतो, आणि समजावून घ्या. कदाचित तुम्हाला बहुमोल माहिती मिळेल, उपयोग होईल.
निवडक उद्यमी
|| उद्यमींचे Digiपीठ ||
Monday, 6 July 2026
आशेचा एक लहानसा किरण
Saturday, 21 March 2026
गुगल सर्च कन्सोल : एक दुर्लक्षित उपयुक्तता
काही वर्षे माझी अशी समजूत झाली होती ( आणि ती काही अंशी खरी सुद्धा होती ) , की आता महत्त्व ( फक्त ) व्हिडीयोज ना द्यावे. कारण सुमारे २०१३ पासून माझ्या web वरची माझी खरी मालमत्ता ( म्हणजे माझी website ) तर तयार आहेच; शिवाय ती बऱ्या पैकी पहिल्या पानावरचे स्थान राखून सुद्धा आहेच.
परिणाम स्वरूप २०१९ नंतर ( जवळ जवळ ७ वर्षे ) मी website साठी काही कंटेंट लिहिला नाही, शिवाय त्याकडे काही लक्ष देखील पुरवले नाही.
विचार इतकाच : की व्यवसायात काही बदल झालेला नाहीये, की त्याच्या स्वरुपात, पद्धतीत. आणि जे काही विचार मांडायचे आहेत, ते तर Youtube द्वारे सुरूच आहेत की.
गेल्या काही महिन्यांतला बदल
प्रत्येक तिमाही ला आढावा घेण्याच्या पद्धतीचा खूप मोठा फायदा
गेले दोन वर्षे आम्ही प्रत्येक तिमाही ला बसून परिस्थिती चे मूल्यमापन करतो, शिवाय पुढच्या तीन महिन्या मध्ये अगदी काही झाले तरी कार्य पद्धतीत मोठ्ठे बदल करत नाही. उलट सखोल विचार करणे, मूळ तत्वांना धक्का न लावणे ह्या गोष्टी कसोशीने पाळतो. ह्यामुळे "नक्की काय होत असेल" ह्याचा नीट विचार करता आला. नाहीतर उथळ विचारांना बळी पडून मोठे नुकसान होऊ शकते.
काय आढळले ?
तर लोकांच्या माहिती शोधण्याच्या पद्धतीत घडून आलेला बदल ह्याचं आहे हा फटका.
तरुण मुले , तसेच ज्यांना ठावूक आहे अशी सर्व मंडळी आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा सर्रास वापर करतात.
जी मंडळी पारंपारिक गुगल सर्च वापरतात, त्यानाही प्रथम कृत्रिम बुधीमत्तेचाच पर्याय दिसतो.
फरक कसा पडला आहे ?
आता Chat GPT किंवा Gemini मुळे मंडळी व्यक्तिगत प्रश्न विचारतात.
ही नवी सर्च इंजिने त्यांचे व्यक्तिगत मुद्देसूद, आस्थेने अमर्यादित, उलट सुलट शंका निरसन करतात. ही उत्तरे ही इंजिने इंटरनेट वरूनच शोधतात. ही सर्वात सुयोग्य उत्तरे सर्वात जलद देण्याची कटीबद्धता गुगल अर्थातच राखून आहे. माझ्या पाहण्यात आले, की गेल्या ६ आणि खास करून ३ महिन्यापासून गुगल आता फार जुना ( माझा बराचसा ) आशय दाखवत नाही. आणि दुसरा तितका तुल्यबळ आशय उपलब्ध नसेल, तर दाखवेलही काही काळ ( हेही माझ्या बाबतीत झालंय ). आणि जरी समोर माझ्या वेबसाईट वरील मजकूर दाखवला तरीही काही अशा अटकळी आहेत, की ज्या द्वारे आपल्याला कळू शकते की लोक आपली website उघडूनच पाहत नाहीयेत.
तर गुगल कडे ही माहिती जात राहते आणि हा क्लिक थ्रू रेशो ( CTR ) सातत्याने कमी कमी होत चालला असेल, तर गुगल किंवा इतर AI इंजिने अनुमान बांधतात, की आता ह्या links लोकांना देत राहण्यात अर्थ नाही.
हे कसं दुरुस्त करायचं ?
२०२५ वि. २०२६
Thursday, 13 November 2025
तोच ( ग्राहक ) च नसेल, तर मी कुठून असणार !
नेटवर्किंग मध्ये काम करत असताना कसे कसे अनुभव येत राहतात, जे शिक्षण म्हणून नाही घेतले ना, तर नक्की वैफल्य येईल. नुकताच आलेला एक अनुभव असा :
मला प्रवासाला जायचे होते. मी शक्यतो माझी हॉटेल खोली वगैरे माझी मीच पोर्टल वरून बुक करून जात असतो. गेल्या वेळी मला असे वाटले, की एखाद्या प्रवास यात्रेच्या सुविधा देणाऱ्या एखाद्या व्यावसायिक व्यक्तीमार्फत हे काम करावे. उद्देश असा की फक्त कमी पैशात सर्व काही असे न असता जरा ऐसपैस , तिथली रूम सेवा वगैरे बद्दल माहिती असलेल्या व्यक्तीने हे करून द्यावे. थोडे अधिक पैसे द्यायची माझी तयारी आहेच. सेवेला मोल असावेच. शिवाय बिझनेस नेटवर्क मधील मेंबर असल्याने जरा अधिक विश्वसार्हता वगैरे.
मी भरपूर वेळ हातात ठेवून वगैरे संपर्क केला, वेळोवेळी रिमाइंड केले. उत्तर “झालय हो, टेन्शन नका घेवू” हे पालुपद. शेवट अगदी प्रवासाच्या २-३ दिवस आधी १०० टक्के आगावू रक्कम भरून हॉटेल रूम बुक केली. दुर्दैवाने मी आजारी पडल्याने रद्द करावे लागणार असे दिसले. सदर व्यक्तीला हे सांगताच ताबडतोब उत्तर “पैसे परत मिळत नाहीत एक दिवस अगोदर रद्द केले तर” !
एकतर दोन दिवस होते हातात. किमान प्रयत्न करणे आणि त्याचे आश्वासन देणे तरी निश्चित शक्य होतच. बाकी काही असो, पण मला हा
कायमच प्रश्न सतावत आलेला आहे … की आपण जे काम करत असतो ना, अगदी कोणतेही, ते कुणा तरी करिता असते नाही का ?
म्हणजे असं… की तो जो … ज्याच्या करिता हा खटाटोप मांडलेला असतो, त्यालाच खोडून काढल्यासारखे झाले ना हे. तेही सेवा व्यवसाय !
शिवाय, बिझनेस नेटवर्क, जिथे फक्त एकमेकांच्या ओळखींचा व्यापार असतो, तिथे तर हे फार घातक ठरू शकते, नाही का ?
पूर्वी माझे एक मशीनरी चे पुरवठादार होते. माझा व्यवसाय मार्केटिंग करून मागण्या मिळविणे व जी मंडळी ती मशीन्स तयार करतात त्यांच्याकडून तयार करून घेवून ती पुरवणे ह्या प्रकारचा होता. तर कधी कधी ह्या पुरवठा दारांकडून वेळोवेळी विविध मशिनरीची वेगवेगळ्या ( म्हणजे मशीन तेच असेल, परंतु समोरून त्या मशीनकडून ईप्सित कार्य बदलले की मॉडल मध्ये बारीक बदल होत असे. ) किंमतपत्रकांची गरज भासायची. त्यामुळे आम्ही ह्यांच्याकडून ही किंमत पत्रके पुन्हा पुन्हा घेत असू. बरेच लोक द्यायचे सुद्धा. मान्य, की कधी कधी माझ्याकडून सुद्धा पूर्वी मागितलेले किंमतपत्रक पुन्हा मागविले गेले असावे. तरी मलाही भान होतेच की ! पण माझ्या ह्या मित्राने मात्र मला खणखणीत सांगून टाकले “आता ह्यापुढे मी तुम्हाला कोणतेही कोटेशन देणार नाही”
एक दुसरा पुरवठादार होता, तो म्हणाला : “तुम्ही नुसतीच कोटेशन्स घेत राहता. ऑर्डर तर कधीच देत नाही !”
ह्या दोघांच्या स्पष्टवक्तेपणाबद्दल मला नक्कीच आदर वाटतो. पण आपला उदरनिर्वाह हा वेळ विकून होत नाही ( आपण नोकरदार नाही ). ह्या अर्थी आपण सांगत आहोत की “अमुक आमच्याकडे आहे , तर ते तुम्ही घ्या”. मग समोरून विचारणा होणार. तर ह्याच मूलभूत संकल्पनेला छेद दिल्यासारखं झालं ना हे.
ह्या उलट एक व्यक्ती म्हणाली तीन वेळा नाही तीनशे वेळा विचारा सर. मी देतच राहीन. ह्या व्यक्तीशी पुढे घनिष्ठ मैत्री झाली. गुज्जू भाई. त्याचं म्हणणं : सुरुवातीला तुझ्याकडून जास्त प्रश्न येतील. हळूहळू कमी होतील.पण तू ट्रेन झालास की मला तुझ्याचकडून भरपूर धंदा येईल ना बाबा !
उगाच नाही लोक गुजराथी मंडळींकडून धंदा शिकत !
.png)















