Saturday 24 April 2021

अगदीच आवश्यकता नसेल, तर अचानक रणनीती बदलू नये !

एक नवीन स्थिती उभी राहिल्याने घरूनच काम करायचं आहे. साथीला इंटरनेट आहे, त्यामुळे ह्या स्थितीचा "जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा " ह्याकरीता बरेच उद्योजक त्यांच्या नेहमीच्या व्यवसाय करण्याच्या  वेगळे प्रकार अचानक बदल करताना दिसून येत आहेत. उदा. अचानक online trainings घ्यायला सुरुवात करणे , किंवा भरपूर zoom meetings करणे किंवा विविध trainings attend करणे इत्यादी.

मला वाटतं , की असं करताना लक्षात ठेवायला हवं कि ह्या सर्व प्रकारांना follow up कृती सुधा अपेक्षित असतात. म्हणजे आत्ता वेळ असताना आपण बीजे पेरली, तर काही काळाने (जेव्हा ही "तात्पुरती" स्थिती ओसरेल) तेव्हा ह्यातून जे उत्पादित होईल, ते हाताळणे आपल्याला शक्य असणार आहे ना ! 

ऐवजी, आत्ताच्या आपल्या कार्य पद्धतीत असलेल्या उणीवा आपण भरून काढण्यावर जास्त भर दिला तर ? आपल्या व्यवसायाला अधिक सबळ करण्यावर जोर दिला , तर ? हे कायमस्वरूपी होईल. तात्पुरती स्थिती ओसरली तरी !

कोणत्या प्रकारची कामं करता येतील ?

  • Orders पूर्तता करताना असलेल्या उणीवा 
  • सेल्स चे follow ups साठी CRM
  • Online प्रोफाईल व्यवस्थित तयार करणे 
  • आपली Range वाढविण्यासाठी नव नवे Strategic भागीदार शोधणे 
  • Cash Flow चा पुनर्विचार 
  • कंपनीचा ३, ५ वर्षांचा प्लान तयार करायचा

इत्यादी असंख्य गोष्टी आहेत. विचार करून पहा. 

कारण उत्तम व्यवसाय करणे, म्हणजे फक्त जास्त सेल करणे नव्हे !

No comments:

Post a Comment

निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.