तर सांगायचं असं, की आता एक अ मुंबैकर म्हणून ( गेले २७ वर्षे मी मुंबईकर नाही ) मुंबईत येतोय, अगदी तसाच मी प्रमुख मेट्रो शहरांत म्हणजे कलकत्ता, दिल्ली, चेन्नई मध्ये तर अर्ध मेट्रो शहरांत उदा बंगळूर, हैदराबाद आणि ह्याच्या किंचित खाली म्हणजे पुणे, अहमदाबाद, सुरत, नागपूर इत्यादी शहरांमध्येही फिरत असतो. अर्थात कामाच्याच निमित्ताने.
मुंबईत तर परिचयाचे असल्याने, आणि आता दिल्ली, चेन्नई आणि कलकत्त्यात देखील मी लोकल किंवा मेट्रो ह्या मार्गेच फिरून कामे करतो. अतिशय चोख असा हा साथीदार आहे. गर्दी फिर्दी जरा धरून चालायचे. तर ह्यासारखा वेळेत आपल्या गंतव्य ( हा शब्द सुद्धा रेल्वे नेच शिकवला ) स्थानी पोचविणारा दुसरा साथीदार नाही. अगदी आधीपासूनच पुणे मुंबई प्रवास सुद्धा माझा मार्ग म्हणजे लोहमार्ग. शक्य नसेल तरच रस्त्याने.
हल्ली पुण्यात मेट्रो झालिये पण पुणेकर आणि चटकन कामे मार्गाला लावण्याची नॅक असलेला मुंबईकर ह्यांच्या वर्तणुकीत असलेला प्राथमिक फरक हा देखील रेल्वे मुळेच आहे. त्यामुळे अगदी मुंबईत येऊन राहिला नाहीत, तरी लोकल वापरायचे कुतूहल जागृत करा. शिवाय चालणे आपोआप होतेच. १० हजार पावले ही मुंबईकर व्यक्ती करिता अत्यंत किरकोळ बाब आहे.
No comments:
Post a Comment
निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.