Monday, 18 August 2025

कठीण काळ समोर : अमेरिकी निर्बंध .....

Whatsapp वरून खूप उथळ मजकूर समोर येतो. नुकताच एक मेसेज आला की कसे आपले पंतप्रधान प्रचंड मुत्सद्दी आहेत, कशा सावध आणि संयमी खेळ्या खेळत आहेत आणि ट्रम्प ह्यांची नाकेबंदी वगैरे करून ठेवली आहे. सोबत अगदि अभ्यासपूर्वक ( तो बेतलेली तत्वेच गन्डलेली आहेत ) प्रतिपादन केलेले आहे, घटनांचे. 

"Whatsapp मेसेज : कुठे गांभीर्याने घेताय" असं बोलायला ठीक आहे हो, पण ह्याची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे गांभीर्याने घ्यायला हवं. जबाबदारीने. प्रतिपक्ष म्हणून नव्हे.

तर पहिलं म्हणजे " हे काय किरकोळ आहे, आपला देश भारी आहे " किंवा "लोकसंख्या आपली ताकद आहे " वगैरे देशप्रेमाच्या स्वस्त संकल्पनांतून बाहेर पडून, प्रथम हे एक गंभीर आर्थिक आव्हान आहे हे स्वीकारायला हवे. कारणे सुद्धा तशीच आहेत.

अमेरिका हा सर्वात जास्त कर्जे घेणारा देश आहे, त्यांचे राष्ट्रीय पातळीवरचे Saving हे त्यांच्या खरेदी पेक्षा कमी असते, मग हा देश श्रीमंत कसा , असा बाळबोध प्रश्न नक्कीच पडू शकतो. बाळबोध ह्याकरिता म्हणतोय, कि एकंदरीत आपल्याकडे असलेली आर्थिक समज दारिद्र्य रेषेच्याही खाली आहे. आणि म्हणूनच वर दिलेल्या Whatsapp पोस्ट्स सहज, ज्ञान म्हणून खपतात, लोक त्यावरून हिरीरीने भाष्य करतात. 

तर कर्जे ही कशाकरता घेतली जातात हे महत्त्वाचे. आपल्यासारखा देश ही जगण्यासाठी, तरण्यासाठी घेत असतो, तर अमेरिकन नागरिक चैनीच्या गोष्टी, किंवा उपजीविके बाहेरील खरेद्या करण्याकरिता. मुळातच अमेरिकेतील गुंतवणूक ही खूप सुरक्षित आहे, त्यामुळे परदेशीय इथे गुंतवणूक करण्यात उत्सुक असतात. त्यामुळे ही कर्जे अमेरिका रणनीती म्हणून वापरते. स्वत:चे सर्व सुरक्षित ठेवून. त्यामुळे अमेरिकेला नाक वगैरे घासायची वेळ आपण नाहीच आणू शकत.

अमेरिका ज्या देशांकडून आयात करते, त्या देशांत भारत १० व्या स्थानी आहे. आणि आपण असे काहीही निर्यात करत नाही, कि ज्यांना पर्याय उभा राहू शकत नाही. उलट आपल्या काही क्षेत्रांना प्रचंड तडाखा बसू शकतो. पर्यायाने नोकऱ्या वगैरे जातील. 

आपण एकदम तडजोड करणेही शक्य नाही. भारताने इतर राष्ट्रांशी बोलणी सुरु केली आहेत, परंतु इकडे आड आणि तिकडे विहीर अशी गोची मात्र झालेली आहे आपली. 

मुळात निकृष्ट दर्जा म्हणून हिणवल्या गेलेल्या चीन वरच आता अमेरिका अवलंबून आहे इतका कायापालट चीन ने साधला. आपल्याला नुसता अभिमान बाळगून नाही चालणार, तर कंबर कसून आपल्या शक्ती स्थळांवर नीती केंद्रित करावी लागेल.

सर्व ठिकाणी काळजी स्वरूप स्थिती असली, तरी भारताची अर्थव्यवस्था ही सर्वात जलद आहे सध्याला. निर्बंध २७ तारखेपासून अंमलात आले, की ही इतकी उत्तम ह्यापुढ राहिलच असे नाही. 

अशा वेळी, एक व्यक्ती समूह म्हणून भारतीय उपखंड जो एक मनुष्य ह्या नात्याने ह्या सर्व पश्चिमी देशांपेक्षाही प्रगल्भ आहे ( हा दुराभिमान नाही ). खूप पूर्वापार आपल्याकडे संस्कृती नांदत आहेत. जो काही आततायीपणा केलाय, तो परकीय राजांनी. तर आपण आपला Stock घ्यायची गरज आहे. इतरांकडे न पाहता. दुर्लक्ष नाही म्हणणार मी, पण स्वयं विश्वास वाढवून. 

भारतीयांकडे व्यापारी वृत्ती उत्तम आहेच. सोबतीला इतका प्राचीन वारसा, ज्याचा आधार आपण ह्यापुढे पथदर्शक म्हणून ठेवावा, आणि इतके स्वत:च बलवान व्हायचा संकल्प सोडवा, कि तैवान किंवा कोरिया प्रमाणे जगच आपल्या कडे धावत येईल.

No comments:

Post a Comment

निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.