माझे एक मित्र श्री तेजस पाध्ये ह्यांच्या सोबत एक संवाद कायम रंगत असे : MSME वि Corporate. ह्यात तेजस छान छान मुद्दे मांडत असत. मोठ्या कंपन्यांच्या संपर्काच्या पद्धती आणि लहान लहान उद्योजकांच्या. किंवा फक्त उलाढाल मोठी झाली तरी दृष्टीकोन न बदलणे वगैरे .....
मी हल्ली हल्लीच खूपशा शेअर मार्केट वर नोंदीत ( म्हणजेच ज्यांनी भाग भांडवल हे तुमच्या आमच्या कडून उभारलेले आहे अशा ) कंपन्यांचा अभ्यास करायला सुरुवात केली आहे. आणि समांतरपणे लहान लहान उद्योजक ह्यांच्यासोबत तर पूर्वापार मी काम करतच आलेलो आहे. मला जाणवते कि, नोंदणीकृत कंपन्या दर तीन महिन्यांना आपले निकाल जाहीर करीत असतात : नव्हे - त्यांना ते कायद्याने बांधील आहे. ह्या जाहीर करण्यात येत असलेल्या निर्णयांचा आकृतिबंध पाहिल्यास लक्षात येतं कि प्रत्येक महिन्यास काही अति महत्त्वाचेच निर्देशांक त्या प्रदर्शित करत असतात.
हे निर्देशांक आहेत हे विसरायला नको. म्हणजे ह्याच्या अंतरंगात खूप प्रकारचे संदर्भ, त्यांची त्या त्या वेळेची चोख नोंद वगैरे खूप काही अस्तित्त्वात असायलाच लागते. म्हणजे इतक्या प्रकारे एखाद्या कंपनीची विचारणा होऊ शकते आणि त्यांना त्या त्या वेळी त्या त्या प्रश्नांना मुद्देसूद उत्तरे देणे भाग असते, तरच त्यांची प्रतिपादने, विधाने, निकाल, परिणाम इत्यादी सिद्ध होऊ शकतात. प्रत्येक भागधारक हा त्या कंपनीचा "मालक" असतो, आणि तो प्रश्न करायला अधिकृत असतो.
तर काही आकडे उदा निव्वळ नफा एखाद्या वर्षी कमी दिसला आणि ताळेबंदा तून असे दिसून आले, कि कंपनीने इतर काही उद्योगांत गुंतवणूक केलेली आहे, तर आधी तर अंतर्गत व नंतर बाह्य auditor ला उत्तर द्यावे लागते कि ह्या मागे काय लांब किंवा नजीकच्या पल्ल्याची भूमिका आहे ते. आणि ह्यानंतही भाग धारकांना उत्तर द्यावे लागू शकते.
थोडक्यात काय, तर मनाला येईल तसे निर्णय ( कृतींचे ) ह्या कंपन्यांना बदलता येत नाहीत.
इथे लहान उद्योजक संपूर्णपणे विरुद्ध वागतात. सारखे निर्णय बदलत असतात. Tracking करत नाहीत. त्यामुळे परिणाम हे अशाश्वत मिळतात. संपत्ती वाढत नाही.
No comments:
Post a Comment
निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.