Sunday, 31 August 2025

त्या tariff चं काय इतकं!

सध्या गाजत असलेल्या ट्रम्प ने भारतावर लादलेल्या ५० टक्के आयातशुल्क ह्या विषयावर माझ्या निकटवर्ती व्यक्तीने टाकलेला हा खडा सवाल. प्रत्युत्तरार्थ माझं जागतिक घडामोडी इत्यादी  भाष्य. 

समांतरपणे आणि सहजच ह्याबद्दल सध्या बरंच लिहून किंवा आंतरजालावर देखील सातत्याने काही ना काही येतंय. भारताने हे संकट हलक्यात घेऊ नये, आणि त्याच वेळी घेऊ पेलून अशी देखील एक मानसिकता.

दरम्यान मनात चाललेल्या घडामोडी. समांतर पुस्तके वाचन आणि सोबत असलेली माहिती. तर मुळात "निर्यात" प्रकाराशी हे सारं संबंधित आहे. भीती ह्याचीच आहे. अमेरिकेची  आपल्याकडून होणारी आयात जिच्यावर एकदम ५० टक्के शुल्क लागू झाले आहे,त्यामुळे अमेरिकन मंडळी भारतीय वस्तू इतक्या वाढीव दराने घेणार नाहीत. परिणामस्वरूप ह्या वस्तू,सेवा ह्यांचे निर्माते आणि त्यात गुंतलेले सर्व हे अडचणीत आलेत.

आपल्याच प्रमाणे चीन, ब्राझील ह्याचीही ५० टक्के नाही, पण कोंडी झालीच आहे. चीन कडे अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे अमेरिकेला थेट कोंडी होतेय,त्यामुळे त्यांच्यावर संक्रांत नाही. आपल्याकडे मात्र असं काहीच नाही की ज्यावर अमेरिकन "फक्त भारत" स्वरूपात अवलंबून रहावेत.

बाळबोध वाटेल, पण खरंच आपल्याला इतक्या निर्यातीची गरज आहे का ? अर्थशास्त्रज्ञ माझ्यावर तुटून पडतील, balance of trade कळत नाही का वगैरे म्हणतील, तरी.....

इसवीसनाच्या सुरुवाती पासून इतिहास पाहिलत तर भारतात विविध संसाधनांची असलेली विपुलता हाच येणाऱ्या प्रत्येक आक्रमणाचा केंद्रबिंदू होता. प्रत्येक काळात,जोपर्यंत मुघल शाही आणि पाठोपाठ इंग्रजशाही आपल्याकडे एकछत्री सत्ता स्थिरावलेली नव्हती,तोपर्यंत तसा स्थिर व्यापार चालत असे आणि त्यातही वरदहस्त हा भारतीय उपखंडातील व्यापाऱ्यांकडे होता. 

आजही आपल्याला लाभलेले कृषिवैभव आपल्या लक्षात येत नाही. आणि जोडीने हिमालयातून वितळणाऱ्या नद्या. कोहिनूर सिंहासन पळवून नेले असेल,पण हे सर्व कुठे जाणार.

तर इंग्रजांच्या निमित्ताने ह्या विखुरलेल्या अनेक स्वराज्य संस्थांना एक भारत रुपी एकसंध देश मिळाला. आता गरज आहे फक्त आपली शक्तिस्थाने जाणून घ्यायची..

No comments:

Post a Comment

निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.