आता पुन्हा मी अशा कार्यक्रमांना न जायचे ठरवले आहे. कारण त्यात येणारा विदारक अनुभव.
दोन्ही कार्यक्रमांत, ज्यांचा सत्कार केला गेला, त्या त्या उद्योजकांना ना बोलू दिले, ना त्यांच्या उद्योग प्रवासा बद्दल काही माहिती. उद्योजक सुद्धा अशा उथळ पुरस्कारांना पूर्ण भुललेले असतात असेच दिसत आहे. त्यामुळे ज्या करिता गेलो होतो ते एक कारण तर संपले.
दुसरे म्हणजे प्रमुख वक्ते जे काही सांगतील ते. दुर्दैवाने एकात एक मंत्री होते. मंत्री महोदयांनी त्यांच्या स्तिमित करणाऱ्या शैलीने तसेच अत्यंत प्रभावी अशा नम्रपणे वारंवार आयोजकांना खुष करून उपस्थितांची मने जिंकून घेतली.
दुसऱ्या कार्यक्रमात एक प्रथितयश उद्योगपती होते, ज्यांनी स्वतः चा PR अत्यंत कसब दाखवून करून घेतला, जोडीने खुपशी आश्वासने दिली. अशी मंडळी नंतर अजिबात भेटत नाहीत असा अनुभव आहे. त्यामुळे ही देखील एक अत्यंत अंधुक अपेक्षा.
दोघांच्याही कडून तसे काहीच विशेष विचारधन नाही मिळू शकले. भोजने वगैरे होतीच. अर्थात मी त्याकरता जात नाहीच. राहिला भाग नेटवर्किंग चा. त्याबद्दल देखील माझे आता वेगळेच मत तयार झालेले आहे. ते पुन्हा कधी.
तात्पर्य असे, की जे ऐकायला गेलो होतो, ते सोडून दोन्ही संस्थांनी मला पहा आणि फुले वाहा असाच सर्व प्रकार केला. त्यामुळे असल्या कार्यक्रमांना आता फुली.
No comments:
Post a Comment
निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.