गेली पंचवीस वर्षे ही हाक मी दरवाज्यात ऐकली नाही असे कधीच झाले नाही. ह्याचे कारण श्री व सौ ढेकणे हे स्वत: प्रत्येक घराच्या दाराशी येवून, बेल वाजवून विचारतात, समोर भाजीची टोकरी असते. भाज्या उत्तम, रास्त दरात वगैरे असतातच. तो प्रश्न नाही.
पण हल्ली whatsapp च्या जमान्यात हे , इतक्या कमालीच्या सातत्याने किती मंडळी करतात ? जरी लिफ्ट असली, तरीही उतरताना हे उपलब्ध साधन नाहीये.
महत्त्वाचे असे, कि कोणत्याही मार्केटिंग शाखेचे कोणतेही खास प्रशिक्षण न घेताही त्यांनी ही गरज बरोब्बर हेरली आहे. हाच त्यांचा USP.
तुमच्या सातत्याला सलाम !
No comments:
Post a Comment
निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.