ग्रुप ची " मालकी " नाही.
नेतृत्वाने हे "ही काय कटकट" असे न पाहणे ही पहिली आवश्यकता असते. मुळात ग्रुप म्हणजेच लोकांचा समूह. अगदी मी स्वतः सुरू केलेला असला तरीही मी त्या ग्रुप चा "मालक" किंवा स्वामी नाही. कारण मुळात जे त्यात सामील झाले, त्यांच्याही मनात त्याच भावना होत्या, त्या फक्त मी छेडल्या असतील. एखाद्या संस्थेचा देखील हा एक ग्रुप असेल,त्याचे तात्पुरते नेतृत्व तुमच्याकडे आलेले असेल. तरीही तुम्ही त्याचे सर्वे सर्वा नाही. हे लक्षात ठेवायला हवे. स्मरण हवे.
सदस्य मंडळी जे काही व्यक्त करतील ते कदाचित आपण ठरवलेल्या मार्गात अडचणीचे असू शकेल. पण त्याचा कटकट असा विचार करता कामा नये. तर मेंबर काहीतरी वेगळे म्हणत असू शकेल हा आस्था दायक विचार आधी हवा.
कदाचित व्यक्तिगत जरी बोलले गेले तरी ते आपल्या पदाच्या दिशेने असेल, त्याच्या अधिकार क्षमतेच्या क्षेत्रात बसणारे. तुम्हाला उद्देशून नाही. असा विचार लाभदायक ठरेल.
एकदा का हा वैचारिक पाया पक्का झाला, की मग चक्क एक विशेष बैठक ह्याच कारणास्तव घ्यावी. आरोप प्रत्यारोप असे स्वरूप न येऊ देण्याकरिता प्रत्येकाच्या मताचा यथोचित मान ठेवून कोणतेही मत प्रदर्शित करावे, करायला संबोधन करावे.
प्रत्येक गोष्टीतून शिकताच येते
नुकतंच एका वेब सिरीज मध्ये एक काल्पनिक प्रसंगात आई आणि मुलगी एकच चित्रपटात सोबत काम करायला तयार नसतात. तर त्यांचे वाद प्रतिवाद घडायला लागतात. लेखक दिग्दर्शक एकच असते : फरहा खान. ती त्यांना चित्रपटात घेत नाही, परंतु त्यांच्या वाद प्रतिवादातून तिला तिच्या पुढच्या कथेची थीम मिळते.
असाच थोडासा दृष्टिकोन नेत्याला ठेवायला लागतो. प्रत्येक इशू काहीतरी शिकवत असतो.
No comments:
Post a Comment
निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.