मला वाटलं, मी धुतलं
यशस्वी जयस्वाल, हॅरी ब्रूक, ऋषभ पंत ह्यांनी संघाचा काहीही विचार न करता मनाला येईल तसा फटका मारला आणि आऊट झाले. ते ते चेंडू सर्वोत्कृष्ट नव्हते. काहीच नाही. आली सनक, हाणा.... मागचा पुढचा विचार शून्य.
बाचाबाची अर्थात स्लेजिंग
इंग्लंड सारखे संघ अगदी आधीपासून हे करतातच. मला आठवतं एकदा गावस्कर आणि एकदा अरविंद डिसिल्वा ह्याबद्दल बोलले होते, की ह्याकडे दुर्लक्ष करणे हे किती महत्त्वाचे आहे. कशासाठी ? स्वतः ची एकाग्रता ढळू न देण्यासाठी. पर्यायाने संघासाठीच. ह्याउलट शुभमन गिल ह्याने स्वतः भांडभांड केली. इथेच त्याची स्वतः ची एकाग्रता ढळली.
फक्त उभं राहायचं होतं
रेड्डी, बुमरा,सिराज, राहुल आणि दस्तुरखुद्द जाडेजा ह्यांना जे जमलं ते बाकीच्यांनी का बरं करू शकू नये ? जेफ्री बॉयकॉट च्या म्हणण्यानुसार "तासनतास उभे राहून अजिबात फटका मारण्याचं टाळणे" हे एक अत्यंत प्रभावी अस्त्र आहे ( क्रिकेट मध्ये ) आणि कौशल्य आहे ( व्यवसायात ).
तिकडे विंडीज आऊट झाले फक्त २७ धावांत ! कारणे : हीच, अशीच. अजून काय !
अंतिम उद्दिष्ट काय ?
ह्याचे थोडे जरी स्मरण असते, तरी अशा चुका घडल्या नसत्या. संयम का ? तर अंतिम उद्दिष्टकरिता. सामन्यात विजय. मनात आलेले फटके मारण्यासाठी अख्खा दिवस होता ना पडलेला.
अशाच चुका आपल्या व्यवसायात होत असतात. अशा वेळी अपेक्षित संधीचे नीट मूल्यमापन करून मगच त्यात शिरावे. कधी कधी "नाही" म्हणायला देखील हरकत नसते.
No comments:
Post a Comment
निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.