Tuesday 30 July 2024

"चालायचंच" कधीपर्यंत .....?

काल एका संस्थेच्या कार्यक्रमाला जायचा योग आला. खरं तर कंटाळा आलेला, हल्ली जिकडे तिकडे कार्यक्रम. तरी माझे मित्र बीमन गांधी ह्यांनी येण्यात रस दाखवला आणि गेलो.

कार्यक्रम तसा वेळेत सुरु झाला, पण नेहमीप्रमाणेच त्या त्या संस्थांच्या नवीन अध्यक्ष मंडळींचे हस्तांतरण, सत्कार इत्यादी कार्यक्रम तुफ्फान लांबविले. ( हेच कदाचित दाखवायचं असतं ह्या मंडळीना ) ज्यातून प्रत्यक्ष वक्ते मंडळींना बोलायला खूप उशीर झाला.

त्यापूर्वी ह्या सत्कारांमध्ये काही उद्योजक मंडळींचा सत्कार केला गेला. त्यावेळी त्यांची दृकश्राव्य फीत चालविली गेली. 

ह्यावेळी आवाजच आला नाही ! तांत्रिक दोष म्हणे !

त्यामुळे नुसत्याच पडद्यावर मूक आकृत्या आणि मग काय ... प्रेक्षक आणि प्रत्यक्ष वक्ते सुद्धा गप्पांत मग्न झाले.

सगळाच poor show ! एवढा मोठा hall घेतलेला, नंतर जेवण-फीवण होतं, आणि हे सर्व विनामुल्य होतं. म्हणजेच प्रत्यक्ष संस्थेचा किंवा प्रायोजक मंडळींचा होता ना हा पैसा. 

कुणी म्हणेल .... "चालायचंच" .....

हेच म्हणतो : कधीपर्यंत ? 

काही इतर गोष्टीही आक्षेपार्ह जाणवल्या :-

वक्त्यांची ओळख नीट करून दिली जात नव्हती 

ते बोलणारे लोक व्यवस्थित निवडलेले नव्हते 

ह्यातही एक दृकश्राव्य फीत प्ले झाली शेवटी, ज्यात एका मराठी व्यावसायिक मंडळींसाठी कार्यरत असलेल्या संस्थेचा उल्लेख होता. त्यात दृक फीत फारच दर्जाहीन होती. त्यातील मराठी ऐकून घेरी यायची पाळी आली.

इतकही कसं पाहत नाहीत ? वर्षात जेमतेम एकदा मिळणारी संधी, कशी काय हलक्यात घेतात ?

No comments:

Post a Comment

निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.