Wednesday 24 July 2024

उत्तरदायित्व वगैरे ......

बिझनेस मॉडेल कॅनव्हास हे एक सुरेख तंत्र आहे, ज्याद्वारे आपण आपल्या प्रस्तावित व्यवसायाचा किंवा योजलेल्या नवकल्पनेचा धांडोळा एका पानावर झटक्यात जेमतेम ९ रकान्यात घेवू शकतो.

ह्यात सर्वात प्रमुख असलेला रकाना आहे तो म्हणजे "Value Proposition". असं काय तुमची कल्पना त्याच्या लाभार्थी ला देईल, ज्याकरता त्याने तुम्हाला त्याचे उचित मूल्य द्यावे. हे मूल्य स्वीकारताना, ते देवू करण्याचे उत्तरदायित्व व्यावसायिकाकडे येतेच.

गीतेत ह्यालाच स्वधर्म असे संबोधले आहे. 

विषय खरे तर वेगळाच आहे, तरीही जरा निगडित आहे म्हणून लिहीतोय. नुकताच केंद्र सरकारने अर्थसंकल्प जाहीर केला, त्यात पायाभूत सुविधा म्हणजेच ज्यात दळण वळण, लोहमार्ग, मेट्रो इत्यादी येतं. ह्या वर भरभक्कम रक्कम योजली आहे. सोबत कौशल्य विकास ह्यावर देखील तरतूद केलेली आहे.

ह्या दोन गोष्टींना धरून पुणे लोणावळा रेल्वे मार्ग वाढविणे ह्या एका प्रकल्पावर अशक्य दुर्लक्ष झालेले आढळते. नुकत्याच आलेल्या एका बातमीनुसार हा प्रकल्प पुणे, PCMC सोबत रेल्वे करणार होती. ज्यात कंटाळून शेवट रेल्वे स्वबळावर करणार आहे म्हणे. हा प्रकल्प allready ५ वर्षे रखडला आहे, आणि ह्यापुढे ( इतर अडचणी न आल्यास ) अजून ४ वर्षे चालेल म्हणे. म्हणजे एक मूलभूत जनोपयोगी निर्णय, ज्याला दुप्पट वेळ ( आणि खर्च सुद्धा ) लागावा ह्या सारखा मूर्खपणा दुसरा दिसत नाही.

दुसरीकडे मेट्रो, मुंबई पुणे अतिरिक्त महामार्ग इत्यादी आकर्षक प्रकल्प ह्यावर भर दिला जातो. पुणे लोणावळा लोकल मात्र सहज रद्द केल्या जातात. लोकं सुद्धा मुकाट सहन करतात.

ते तर ठीकच आहे, पण मुळात ज्यांना हे कौशल्य द्यायचं ते कनिष्ठ उत्पन्न गटातील प्रत्यक्ष काम करणारे लोक असतात. चाकरमाने. तर त्यांचे दळण वळण हे सुकर झाले तर आपला स्वधर्म निभावेल इतका व्यवहार तरी उमजणे नक्कीच अपेक्षित आहे !

यानिमित्ताने मी माझ्या व्यवसायाबाबत विचार करताना त्यातील मूल्य माझ्या ग्राहकांना पोचवायचा सतत विचार करायलाच हवा आहे ह्याची पुन्हा जाणीव झाली. त्यात जे resources मी अमलात आणतो, वापरतो खासकरून मनुष्यबळ त्यांना काही अडचणी येत आहेत का, हा विचार केंद्रस्थानी असायला हवा,हे ठळकपणे जाणवले.

No comments:

Post a Comment

निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.